चित्र-चरित्र

शांता जोग
शांता जोग
अभिनेत्री
२ मार्च १९२५ --- ५ एप्रिल १९८०

मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीमधील एक प्रख्यात नाव म्हणजे शांता जोग. वि.वा. शिरवाडकर यांच्या ‘नटसम्राट’मध्ये अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती. ‘आराम हराम आहे’, ‘२२ जून १८९७’, ‘वऱ्हाडी आणि वाजंत्री’, ‘सासुरवास’, ‘उमज पडेल तर’, ‘कलावंत विकणे आहे, ‘या सुखांनो या’, ‘गारंबीचा बापू’, ‘झाकोळ’ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. महाराष्ट्रात १९८०सालच्या आसपासच्या काळात पेट्रोल-डिझेलची अभूतपूर्व कमतरता होती. त्यामुळे लहान गावात नाटक कंपनीची गाडी, तिथे जाताना इंधनाची दोन-तीन पिपे भरून बरोबर घेत असे. त्याच गाडीत नाटकाची ड्रेपरी, नटांचे कपडेलत्ते व इतर सामान, नाटकात भूमिका करणारे कलावंत आणि अन्य सेवकवर्ग बसबरोबर या गावाहून त्या गावाला जात असे. अशाच एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग यांचा मृत्यू झाला. शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ‘महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो. शांता जोग यांचे आत्मचरित्र ’रंग आणि दंग’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘लग्नाची बेडी’, ‘हॅम्लेट’, ‘हिमालयाची सावली’ ही त्यांची गाजलेली नाटके

-मंदार जोशी



चित्र-चरित्र