ताज्या घडामोडी

अतिथी कट्टा

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ११४ व्या जयंतीनिमित्त - १ मार्च २०२४
---------------------
‘ असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ’

झटपट रिव्हियू

शिवरायांचा छावा ================================================== निर्माते : वैभव भोर, किशोर पाटकर, मधू ================================================== लेखक-दिग्दर्शक, गीते : दिग्पाल लांजेकर ================================================== संगीतकार : देवदत्त मनीषा बाजी ================================================== संकलन : सागर शिंदे, विनय शिंदे ================================================== छायांकन : प्रियांका मयेकर ================================================== कलाकार : भूषण पाटील, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, राहुल देव, समीर धर्माधिकारी, रवी काळे, इशा केसकर, तृप्ती तरोडमल इ. ================================================== दर्जा : तीन स्टार ================================================== ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड,’ ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ अशा ऐतिहासिक चित्रपटांनंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मांडणारा ‘शिवरायांचा छावा’ घेऊन आले आहेत. शंभुराजेंचा पूर्ण पराक्रम इथे मांडला जात नाही. मात्र, त्याचा पहिला अध्याय सांगितला जातो. शिवछत्रपतींचा वारसा सांभाळणारे छत्रपती संभाजीराजे नक्की कसे होते, त्यांची स्वराज्यामागची भूमिका काय होती, या गोष्टी इथे अधोरेखित करण्यात येतात. तगडी स्टारकास्ट, बंदिस्त कथा-पटकथा, उत्तम अॅक्शन यांच्या जोरावर ‘शिवरायांचा छावा’ एकदा अनुभवण्यासारखा नक्की झाला आहे. चित्रपटाची सुरुवात संभाजीराजेंच्या (भूषण पाटील) राज्याभिषेकाने होते. शिवरायांच्या देहावसानानंतर रयत पोरकी झाली असून, संपूर्ण राज्यात महाराजांची कमतरता भासत आहे. दुसरीकडे, औरंगजेब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रयतेवर अमानुष असा छळ सुरू केला आहे. ‘जिझिया’ कर वसूल करणे, मुली-महिलांवर अत्याचार करणे असे प्रकार सर्वत्र सुरू आहेत. अशा परिस्थितीत संभाजीराजेंचा राज्याभिषेक होतो आणि रयतेचे पालकत्व ते स्वीकारतात. आजी जिजाऊ (मृणाल कुलकर्णी) वडील शिवछत्रपती (चिन्मय मांडलेकर) यांची शिकवण आणि संस्कार यांच्या वाटेवरून पुढे जाण्याचा निर्णय घेतात. रयतेसाठी स्वत: मैदानात उतरण्याचे ठरवतात, त्याची गाथा चित्रपट सांगतो. शिवाजी महाराजांनंतर दख्खनवर स्वारी करण्यासाठी औरंगजेब (समीर धर्माधिकारी) दबा धरून बसला असून, मराठ्यांचा पाडाव करण्यासाठी विविध युक्त्या लढवत आहे. अशा परिस्थितीत काही जुन्या आणि नव्या दमाच्या सहकाऱ्यांसोबत शंभुराजे त्याच्याविरोधात लढण्याचे ठरवतात. बुऱ्हाणपूरात काकर खान (राहुल देव) रयतेवर अमानुष अत्याचार करीत असल्याचे शंभुराजेंना समजते. औरंगजेब आणि काकर खानाशी ‘गनिमी कावा’ करून लढण्याचे ते ठरवतात. बुऱ्हाणपूर इथे गोरगरीब जनतेकडून लुटलेला खजिना असल्याची माहिती मिळते. अशा परिस्थितीत ही मोहीम फत्ते करण्याचे नियोजन केले जाते. पत्नी येसूबाई (तृप्ती तोरडमल) यांच्यावर राज्यकारभाराची जबाबदारी देऊन सरसेनापती हंबीरराव (प्रसन्न केतकर), बहिर्जी (रवी काळे), जोत्याजी (अभिजित श्वेतचंद्र), येसाजी कंक (भूषण शिवतरे) यांना संभाजीराजे सोबत घेतात. मग ही मोहीम कशी पूर्णत्वास जाते? त्यामध्ये कोणत्या अडचणी येतात? औरंगजेब आणि त्याचे सहकारी शंभुराजेंविरोधात कोणते डावपेच आखतात आणि त्याला शंभुराजे कसे सामोरे जातात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘शिवरायांचा छावा’ बघायला हवा. सिनेमात सुरुवातीच्या टप्प्यात पास्ट-प्रेझेंट मांडणी केली जाते. शिवराय आणि जिजाऊंच्या आठवणीने हळवे झालेले संभाजीराजे दाखवले जातात. सुरुवातीचा काही वेळ संभाजीराजेंची व्यक्तिरेखा विकसित करण्यात जातो. त्यामुळे अर्थातच मध्यंतरापर्यंत सिनेमा म्हणावासा वेग धारण करीत नाही. मात्र, त्यानंतर सिनेमा वेग घेतो. संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व उलगडताना सिनेमाच्या शेवटी ‘शौर्यगाथा पुढे सुरू राहील...’ असे सांगितले जाते. त्यामुळे संभाजी महारांच्या आयुष्यातील सर्व समर प्रसंग, मतभेदाचा कठीण काळ आणि त्याहीपुढे जाऊन त्यांनी जे सोसले त्याचं दर्शन इथे घडत नाही. कदाचित ते पुढच्या भागात असावे. इथे बुऱ्हाणपूर मोहिमेवरच अधिक ‘फोकस’ केला जातो. ही मोहीम पडद्यावर उत्तम पद्धतीने मांडण्यात लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. एक धाडसी आणि पराक्रमी शंभुराजे पडद्यावर साकारले आहेत. बुऱ्हाणपूरच्या बाजारातील एक गाणे, तेथील मारवाड्याकडून होणारी मदत असे प्रसंग कथेची लय काहीशी सोडतात. त्याची गरज नव्हती, असे वाटते. सिनेमाची जमेची बाजू म्हणजे इथे ‘व्हीएफक्स’चा अतिशय संयत वापर केला आहे; किंबहुना जेथे वापर आहे तेथेही तो शिताफीने केला आहे. नाही तर सध्या ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘व्हीएफएक्स’वरच तारून नेला जातो. इथे तुलनेने तसे होत नाही. संभाजीराजेंच्या राज्याभिषेकावेळचे गाणे आणि एक देवीचे गाणे चांगले झाले आहे. सर्वच प्रमुख कलाकार आपल्या भूमिकांना योग्य न्याय देतात. भूषण पाटीलने संभाजीराजे पूर्ण ताकदीने साकारले आहेत. काही कसोटीच्या प्रसंगात त्याची ‘कसोटी’ लागते. मात्र, तिथे तो आपले सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी छोट्या; पण महत्त्वाच्या भूमिका साकारतात. इथे संभाजीराजेंनी आपल्या सहकाऱ्यांची मोट बांधताना जो जुन्या-नव्याचा संगम बांधला होता, ती गोष्ट अधोरेखित केली जाते. त्या अर्थाने ज्योत्याजीची भूमिका करणारा अभिजित श्वेतचंद्र लक्षात राहतो. याशिवाय रवी काळे, प्रसन्न केतकरही आपली छाप सोडतात. संभाजीराजेंच्या सहकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा उठावदार कशा होतील, ते पाहिले जाते. ऐतिहासिक चित्रपटात लेखक-दिग्दर्शकाला एक तारतम्याचे भान असावे लागते, ते इथे दिसते. काही अपवाद वगळता पोरकटपणा, हास्यास्पद प्रकार, ‘अॅक्शनपॅक्ड’साठी ‘साउथ स्टाइल’ मारामारी असे प्रकार इथे नाहीत. अर्थात दिग्पाल लांजेकरकडून तशी अपेक्षाही नाही. त्याचा प्रेक्षकवर्ग आता निश्चित झाल्यामुळे तोही लेखक-दिग्दर्शकाकडून आशयघन सिनेमाचीच अपेक्षा करतो. शंभुराजेंचे आयुष्य दाखवणारा खूप ‘ग्रेट’ स्वरूपाचा अनुभव सिनेमा देत नसला तरीही तो एकदा पाहण्यासारखा नक्की झाला आहे.

जन्मदिन

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया