आठवणी `आलिया भोगासी`च्या…
रामदास जिद्दी आहे हे असे म्हणणे ही द्विरुवली तर ठरणार नाहीना इतके रामदासचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. अर्थात हा संघर्ष राजकीय नसून कलाप्रांतातला आहे. समाजहिताचा विचार हा रामदासचा स्थायीभाव आहे. आणि याच हेतूने त्याचा कलाक्षेत्रातला आजवरचा प्रवास चालू आहे. समाजाचे हित, हा विचार म्हणजे रामदास समाजसुधारकाच्या भूमिकेत वावरतो असे नाही. कलेच्या माध्यमातून समाजाला प्रगतीकडे नेण्याचा उद्योग हा त्याचा स्थायीभाव आहे. जिद्द आहे.
साठच्या दशकात रामदास नगर जिल्ह्यातून ड्रॉइंग टीचर म्हणून मुंबईच्या मारवाडी विद्यालयात दाखल झाला. मुंबई महानगर त्याला अनेक अंगानी खुणावत होते. मराठी प्रमाणेच त्याचे हिंदी भाषेवरही प्रेम आहे. यासाठी त्याने मारवाडी विद्यालयातील मुलांना चित्रकला शिकवत असतानाच ‘ऋतुराज’ हे हिंदी मासिक काढले. काही वात्रटिका लिहायला सुरवात केल्या. पण त्याच्या एवूâण उत्साहाला मासिकाचा प्रपंच तोकडा वाटत असावा.
मुळात चित्रकार असल्याने सिनेमाकडे त्याचे लक्ष वेंâद्रीत होणे हे स्वाभाविक होते. सत्तरच्या दशकात मराठी सिनेमा हिंदीच्या स्पर्धेने व प्रेक्षक कमी असल्याने एक प्रकारे कोंडीत सापडलेला होता. कौटुंबिक, तमाशा आणि विनोदी अशा तीन विषयावरच चित्रपट निघत होते. पडत होते. एखादाच चित्रपट निर्मात्याला पैसे परत मिळवून देत होता. हिंदीत कलर चित्रपटांचे युग सुरू होऊन दहा वर्षे उलटली होती पण आर्थिक डबघाईमुळे मराठी निर्माते रंगीत चित्रपटांचा विचारही करू शकत नव्हते.
या पाश्र्वभूमीवर रामदासने चित्रपट क्षेत्रांत उतरायचे ठरविले. पण निर्मितीचा अजिबात अनुभव नव्हता. म्हणून दादा कोंडकेच्या युनिटमध्ये ‘सोंगाड्या’ नंतर रामदास निर्मिती सूत्रधार म्हणून सामील झाला. तो काळ असा होता की कोणीही सुशिक्षित तरुण मराठी चित्रपट व्यवसायात येत नव्हता. कारण काही भवितव्यच नव्हते. दादांच्या चित्रपटाच्या शुटींगच्या निमित्ताने रामदासच्या कोल्हापूरच्या पेâNया सुरू झाल्या. भालजी पेंढारकरांच्या ‘जयप्रभा’ स्टुडिओत दादांच्या चित्रपटाचे शुटींग व्हायचे. रामदासची भेट भालजींशी झाली. भालजीना सारा चित्रपट व्यवसाय बाबा म्हणतो. बाबांनी रामदास सारखा सुशिक्षित तरुण मराठी सिनेमात आला म्हणून त्याचे कौतुक केले. दादांच्या चित्रपटाच्या मुहूर्ताचे पेढे रामदासने बाबांना स्टुडिओतील पहिल्या मजल्या वरील त्यांच्या घरी नेऊन दिले.
दादा कोंडकेच्या युनिट मधे एक दोन चित्रपटांच्या निर्मितीचा अनुभव गाठींशी आल्यावर रामदासने स्वत:च चित्रपट निर्माण करायचे स्वप्न पहायला सुरवात केली.
दादांच्या युनिटमधे रामदासने निर्मितीचा कार्यानुभव घेतला होता. दिग्दर्शनाचे धडे घेतले नव्हते. त्यामुळे स्वत: दिग्दर्शन करण्याचे धाडस त्याच्या पाशी नव्हते. विजय तेंडुलकरांना रामदास कथे-पटकथेसाठी जाऊन भेटला. तेंडुलकरांनी प्रथम कथा सांगीतली नाही फक्त एवढेच सांगीतले की निळु पुâले आणि डॉ. लागू यांच्या अभिनयाची जुगलबंदी करणारी कथा तुला देईन.
रामदासचा पुढचा प्रश्न होता, तुम्ही लिहाल ते मी पडद्यावर आणिनच पण दिग्दर्शन कोणाला द्यायचे?
तेंडुलकर म्हणाले ‘नवा दिग्दर्शक हवा ! जब्बार पटेलांना विचार. त्याला सिनेमात यायचे आहे.’
रामदास मग पुढच्या उद्योगाला लागला. मुख्य म्हणजे भांडवल उभे केले पाहिजे. कथालेखक, दिग्दर्शक निश्चित करण्याआधी पैशाची व्यवस्था महत्त्वाची होती.
रामदास तेव्हा गिरगांवातील फणसवाडीत रहात होता. त्याच्या घरी फोनही नव्हता. कोणाला फोन करायचा तर बाहेर हॉटेलमधला फोन वापरुन करायचा. इथपासूनच रामदासच्या जिद्दीची कसोटी सुरू झाली. अडचणीवर मात केल्याशिवाय चित्रपट पूर्ण होणार नाही याची रामदासला पुरेपूर कल्पना होती.
भांडवल, दिग्दर्शक, नट मंडळी जमविल्यावर म्हणजे त्यांच्याशी बोलून झाल्यावर रामदास तेंडुलकरांना पुन्हा भेटला. तेंडुलकरांनी ‘सामना’च्या कथेची रुपरेखा सांगीतली. रामदास नगर जिल्ह्यातला. त्या जिल्ह्यात सहकारी साखर कारकान्यांचे चेअरमन रामदासने पाहिलेले होते. त्यालाही कथा ओळखीची वाटली.
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया