‘ट्रिपल सीट’ म्हणजे दिवाळीचा तिखट-गोड फराळ – अंकुश चौधरी
——
ही गोष्ट जेव्हा माझ्यासमोर आली तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती आपण मोठ्या पडद्यावर साकारायलाच हवी. त्यामुळे ही गोष्ट ऐकल्या ऐकल्या लगेचच मी होकार दिला. लेखक-दिग्दर्शक मंडळींचा हा पहिलाच चित्रपट असूनही मी गोष्टीच्या वेगळेपणासाठी होकार दिला. मी नेहमीच कोणताही चित्रपट करताना त्याच्या विषयाला प्राधान्य देतो. तीच गोष्ट यावेळीही मी केली. माझा नेहमीच पूर्ण कुटुंबाला आवडेल अशी गोष्ट देण्याचा प्रयत्न असतो. तो प्रयत्न या चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शकांनी केलाय आणि आम्ही कलावंतांनी त्यांचे प्रयत्न पडद्यावर दिसायला चांगले वाटतील याची काळजी घेतली आहे. अगदी लहान मुलांपासून ते शंभरी पार केलेली मंडळीदेखील हा चित्रपट एन्जॉय करू शकतील, हे मी ठामपणे सांगू शकतो. बेंगलोरमध्ये घडलेली ही खरी गोष्ट आहे. ती आमच्या लेखकांच्या लक्षात आली. आपला प्रेक्षक सर्वाधिक महत्त्व देतो ते गोष्टीला. त्यामुळेच ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची मला पहिल्यापासूनच खात्री होती. दिवाळीचा सण हा आनंदाचा आहे. त्यामुळेच ऐन दिवाळीत आम्ही ही गोष्ट घेऊन प्रेक्षकांसमोर आलो आहोत. छानसा तिखट-गोड असा हा दिवाळीचा फराळ आहे. प्रवीण तरडेसारखे मोठमोठे फटाकेदेखील या चित्रपटातून फुटणार आहेत. दोन छान लवंग्यादेखील या चित्रपटात आहेत.
– अंकुश चौधरी
काही निवडक प्रतिक्रिया:
प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर
लेखिका जयश्री दानवे यांनी आपले वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सांगितलेल्या आठवणी या मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया