‘मराठी कलाकारांकडून खूप काही शिकलोय..’ : मुकेश ऋषी
‘दुनियादारी’ आणि ‘क्लासमेट’ या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीवर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे. मैत्रीचे नवे पैलू उलगडणारा ‘दोस्तीगिरी’ हा चित्रपट येत्या २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील अभिनेते, दिग्दर्शक आणि संगीतकार या टीमशी मारलेल्या गप्पा.
——
‘ट्रकभर स्वप्न’ हा सिनेमा एका सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वप्नांचा प्रवास सादर करणारा सिनेमा आहे. या चित्रपटाचं ‘ट्रकभर स्वप्नं’ हे शीर्षकच मला खूप आवडलं. आपल्या सर्वांनाच स्वप्नं पाहायला खूप आवडतात. मात्र आपण स्वप्नं काही एक-दोन बघत नाही. ती दररोज आणि शेकडो, हजारो पाहतो. त्यामुळेच ‘ट्रकभर स्वप्नं’ हे शीर्षकच प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणले असं मला वाटतं. आजवर मी तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमिळ अशा विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मात्र मराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव मला मिळाला. खरं तर मी फार मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं नाही. यापूर्वी मी ‘बालगंधर्व’ चित्रपटामध्ये झळकलो होतो. या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. त्याला मोठं यश मिळालंही होतं. हा चित्रपट पाहून मला अनेकांचे फोन आले होते. परंतु, मराठी भाषाच समृद्ध असल्यामुळे या भाषेत काहीतरी चांगली भूमिका आली तरच ती आपण करायची असं मी ठरवलं होतं. त्यामुळे ‘बालगंधर्व’नंतर माझा मराठी नवीन सिनेमा यायला इतकी वर्षं लागली.
– मुकेश ऋषी
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया