‘छत्रपती शासन’मधून आजच्या काळातील वैचारिक द्वंद्व पडद्यावर
——
छत्रपती शिवाजी महाराज हृदयातून डायरेक्ट रक्तात आले, जरा मेंदूंत डोकावले असते तर बरं झालं नसतं का? “छत्रपती शासन” सिनेमातील हा झणझणीत संवाद अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. १५ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मी प्रा. डॉ. समर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा माझ्यासाठी खूप विशेष चित्रपट आहे. आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक सिनेमे आले. पण मला त्याच्यात काम करायला हवी तशी संधी मिळाली नव्हती. तशी संधी मला पहिल्यांदाच मिळाली आहे. या सिनेमाचे सर्वेसर्वा निर्माता दिग्दर्शक आणि लेखक खुशाल म्हेत्रे यांनी मला लक्षात ठेवून गुंफलेली भूमिका खरंच मला साजेशी आहे. या सिनेमात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज नाहीत. पण त्यांचे विचार दिग्दर्शकाने नेमकेपणाने मांडले आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी मला काही वेळा फोन केले. नंतर बरेच मिस्ड कॉलही झाले. त्यावरून आपण खरोखरीच दिग्दर्शकाला हवे आहोत, याची जाणीव मला झाली आणि प्रत्यक्ष भेटीत या दिग्दर्शकाचा खरेपणा त्यांना भावला आणि लगेचच हा चित्रपट मी स्वीकारला. नवोदित दिग्दर्शक म्हटलं की त्याचा वैयक्तिक संघर्ष असलेला ‘बायोपीक’ पडद्यावर झळकण्याची दाट शक्यता असते. परंतु, तसं काही खुशाल म्हेत्रे यांनी केलेलं नाही. म्हणूनच मला ते आणि त्यांचा हा चित्रपट अधिक भावला.तो खरा वाटला. मनोरंजनात्मक चित्रपटाची नेमकी व्याख्या काय? माझ्या मते लेखन, दिग्दर्शनातील खरेपणामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन होऊ शकतं. त्यामुळे मी या चित्रपटाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो. निर्माता-दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी आर्थिक बाजू भक्कम करताना किती संकटांना तोंड दिलंय याची मला कल्पना आहे.
– मकरंद देशपांडे
काही निवडक प्रतिक्रिया:
नरेंद्र चौधरी
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया