चित्र-चरित्र

जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशी
अभिनेता
२७ जानेवारी

नाटकं, मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये जितेंद्र जोशी हे नाव आग्रहानं घेतलं जातं. अभिनेता, कवी आणि सूत्रसंचालक अशा विविध स्वरूपात तो प्रेक्षकांसमोर आला आणि प्रत्येक भूमिकेत तेवढाच लोकप्रिय झाला. जितेंद्रने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सतीश राजवाडे यांच्यासोबत त्यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘नकळत सारे घडले’, ‘हम तो तेरे आशिक है’मधल्या त्याच्या अभिनयाचं समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. त्याने मराठीवरच्या ‘हास्यसम्राट’ या मालिकेचं सूत्रसंचालन केलं. त्याच्या विनोदी स्वभावाचं दर्शन या कार्यक्रमातूनही घडलं. अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेलं "कोंबडी पळाली" हे गाणं लिहीणारे गीतकार जितेंद्र जोशीच आहेत. ‘पक पक पकाक’, ‘गोलमाल’, ‘सुंबरान’, ‘गुलमोहर’, ‘झकास’, ‘मॅटर’, ‘कुटुंब’, ‘तुकाराम’, ‘दुनियादारी’, ‘बाजी’, ‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’ हे त्याचे काही उल्लेखनीय चित्रपट.

जितेंद्र यांनी २०२२ मध्ये 'गोदावरी' चित्रपटाची निर्मिती केली होती. 'गोदावरी' ह्या चित्रपटाला २०२१ मध्ये भारताच्या चित्रपट महोत्सवामध्ये दोन पुरस्कारांद्वारे गौरविण्यात आले होते. त्यापैकी एक पुरस्कार जितेंद्रला अभिनयासाठी मिळाला होता. 'वेड' या चित्रपटांमध्येही जितेंद्र जोशी यांनी एक व्यक्तिरेखा साकारली आहे.

- मंदार जोशी



चित्र-चरित्र